सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अजीत दादा चा दिलासा

मुंबई, दि. १० – महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी दिनांक १३/ ०१/२०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण २४ दिवसांची मुदतवाढ दिनांक ६/२/२०२५ पर्यंत दिली होती. त्या नंतर राज्यात सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून कुठलीही मुदतवाढ दिलेली नाही, असे पणन विभागाने स्पष्ट केले आहे.
काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात २४ दिवस व तेलंगणा मध्ये १५ दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे मा. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितल्याची बातमी आज देण्यात आली आहे. तथापि ही नव्याने देण्यात आलेली मुदतवाढ नसून सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाने दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचे या अनुषंगाने राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे कुठलेही नुकसान होणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दिला माध्यमाशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top